Sunday, 9 May 2021

विवाह समारंभात ही दोन्ही पाहुणे मंडळींची रॅपिड टेस्ट करणे गरजेचे

 विवाह समारंभात ही दोन्ही पाहुणे मंडळींची रॅपिड टेस्ट करणे गरजेचे


उस्मानाबाद / बाळासाहेब अणदूरकर

     ध्या वाढता फैलाव चिंताजनक दिसून येत आहे. बाधितांच्या आकड्याबरोबरच मृत्यूचाही आकडा वाढत आहे त्याचा रोकथाम करण्यासाठी प्रशासनाने कडक प्रतिबंध करणे गरजेचे आहे त्याचाच एक भाग म्हणून विवाह समारंभाच्या ठिकाणी ही प्रशासनाने रॅपिड टेस्ट करणे गरजेचे आहे. जेणेकरून काही प्रमाणात वाढत्या आकड्याला पायबंद घालण्यास मदत होणार आहे.त्यामुळे प्रशासनाने उपस्थित दोन्ही पाहुणेमंडळीची रॅपिड टेस्ट करूनच विवाह समारंभ पार पाडण्याची गरज अत्यावश्यक झाली असल्याने प्रशासनाने याबाबत कडक पावले उचलावीत असा सूर नागरिकांतून निघत आहे.

को रो ना च्या वाढत्या आलेखाने आता उच्च सीमा गाठली आहे. दैनंदिन उस्मानाबाद जिल्ह्याचा कोरोना बाधितांचा आकडा सातशे-आठशे च्या पुढे असतो आणि मृत्यू ही वीस च्या आसपास असतात. हा आलेख असा वाढला आहे की मोबाईल उघडताच सोशल मीडिया वरती पहिली पोस्ट असते ती म्हणजे भावपूर्ण श्रद्धांजली!काही दिवसांपूर्वी अशा मोबाईल पोस्टला प्रतिसाद म्हणून भावपूर्ण श्रद्धांजली लिहिलं जात होतं दुरची - अनोळखी व्यक्ती असत.परंतु आता निकटची माणसे क्षणातच जग सोडताना पाहून अगदी श्रद्धांजली वाहने तर दूरच पोस्ट पाहतानाही भीती वाटत आहे. सर्वत्र भीतीचे वातावरण असतानाच त्यात भर ही शिक्षित - उच्चशिक्षित जबाबदार पण बेजबाबदारपणे वागणाऱ्या नागरिकांची आहे. विना मास्क गर्दी करणे मग ती पालेभाज्या ची खरेदी असो किराणा दुकान असो किंवा मेडिकल सर्व ठिकाणी नियम मोडून खरेदी विक्री सुरू आणि त्यातूनच कोरोना प्रसारास गती मिळते . प्रशासन सतत वेळोवेळी सुधारित सूचना देत आहे परंतु नागरिक मात्र प्रशासनास दोष देत व राजकीय पुराण्या पुढाऱ्यांना दोष काढत अशा कडक नियमन मधूनही पळवाट निघते का? हे शोधताना दिसत आहे.कोरोना काळातील सर्व नियम धाब्यावरती बसवून लग्न समारंभ उत्सव हे खोट्या प्रतिष्ठेचे पांघरून घेत गर्दी जमवताना पाहावयास मिळत आहेत. कोरोनाला पायबंद घालण्यासाठी प्रशासनाने विवाह समारंभाकरिता पंचवीस व्यक्तींची मर्यादा घातलेली आहे. परंतु विविध ठिकाणाहून जमणार्या पंचवीस व्यक्ती कश्या आहेत हे समजत नाही. त्याकरिता प्रशासनाने सदर समारंभाच्या ठिकाणी यात सहभागी होणाऱ्या व्यक्तींची रॅपिड अंटिजेन टेस्ट करून सहभागी होऊ दिले पाहिजे कारण यामध्ये जर एखादा कोरोना बाधित जर असेल तर त्यामुळे त्याचा फैलाव मोठ्या प्रमाणात होऊ शकतो. अशा पद्धतीने जर रॅपिड टेस्टची व्यवस्था समारंभा ठिकाणी केली तर या ठिकाणातून होणाऱ्या प्रादुर्भावापासून रोखता येऊ शकेल. कारण अशा बिकट काळात ही नागरिक विवाह समारंभाच्या बाबतीत गंभीर दिसत नाहीत अशी सुरक्षा जर नसेल तर म्हणावे लागेल की,"लगीन वरात. , आणि कोरोना घरात " 


बेवजाह घर से निकलने की क्या जरुरत है!

और मौत से आखे मिलाने की क्या जरुरत है!


जिंदगी रहेमत है खुदाकी उसे संभाल के रख !

कबरस्थान सजाने की क्या जरुरत है!


सबको मालूम है बाहर की हवा कातिल है!

फिर कातिल से उलझने की क्या जरुरत है!


दिल को बहलानेको घर मे ही मजा काफी है !

यूंही गलियो में भटकनेकी जरूरत क्या है!


प्रतिक्रिया

लग्न समारंभाला २५माणसांनाच परवानगी असतांना अनेक जण जमा होत असल्याने कोरोनाची वरात आता प्रत्येक व—हाडींच्या घरा—घरात पोहचते की काय?असा सवाल नव्याने ऊभा राहिला आहे.कोरोनाचे नियम धाब्यावर बसवले जात आहेत लग्न समारंभाला अधिक गर्दी केली म्हणून कांही कुटुंबाला दंड ही लावला जातो आहे हे जरी खरे असले तरी यामुळे कोरोनाचा प्रसार वाढतचआहे.कोरोनाला ब्रेक द्यायचाच असेल तर लग्न समारंभातील सर्व सहभागींची त्याच क्षणी कोरोना चाचणी केली तर कोरोनाला रोकता येईल आशा चाचणी करण्यासाठी आरोग्य यंञनेवर तान येईल पण हे केलेच पाहिजे.

                                                        प्रा.राजा जगताप



No comments:

Post a Comment