Wednesday, 21 April 2021

विनाकारण बाहेर फिरताय ? तर रॅपिड टेस्टला सामोरे जा!

 विनाकारण बाहेर फिरताय ? तर रॅपिड टेस्टला सामोरे जा!


उस्मानाबाद,
आज रोजी पासून उस्मानाबाद जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार अत्यावश्यक सेवा या सकाळी सात ते अकरा या कालावधीतच सुरू राहणार व आकरा नंतर संपूर्ण शहरामध्ये कडक संचारबंदी असे सुरू झाले . 

याप्रसंगी या प्रसंगाची जागृती होण्याचे हेतूने संबंधित सर्व विभागाने रूट मार्च करून जागृती केली व नागरिकांना घरातच राहण्याचे आव्हान केले व विनाकारण या संचार बंदी च्या काळामध्ये फिरणाऱ्या नागरिकांची रॅपिड टेस्ट करून घेतली जात आहे. व जे यामध्ये संसर्गित आहेत त्यांना शासकीय रुग्णवाहिकेचे मधून रुग्णालयात दाखल केले जात आहे. आज उस्मानाबाद येथील शिवाजी महाराज पुतळा चौकामध्ये विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांच्या रॅपिड टेस्ट केल्या. त्यामध्ये बरेच नागरिक हे बाधित असल्याचे आढळले.



No comments:

Post a Comment