Tuesday, 9 November 2021

आत्महत्येचा विचार नको, फक्त एक फोन करा शेतकऱ्यांना शिवार संसदची भावनिक हाक

 आत्महत्येचा विचार नकोफक्त एक फोन करा


 
शेतकऱ्यांना शिवार संसदची भावनिक हाक

उस्मानाबाद:
 
 अतिवृष्टीच्या तडाख्याने प्रचंड नुकसान होऊन हातातोंडाशी आलेली पिके हिरावली गेली . बोगस बियाणेदुबार-तिबार पेरणीआर्थिक चिंता अशा एक ना अनेक परिस्थितीत आपण आतापर्यंत धीराने तोंड दिले आहे,

तसेच अतिवृष्टी पोटी शासनाचे अनुदान अदयाप पर्यन्त काही शेतकरयांना मिळालेले नाही. . अतिवृष्टीमुळे शेतीचे प्रचंड नुकसान होवून देखील विमा कंपनी विमा देण्यास टाळाटाळ करीत आहे. बळीराजाच्या दुखावर मीठ चोळण्याचे काम विमा कंपनी करीत आहे. त्यात शासनाचे पंचनामे ग्राहय न धरता विमा कंपनीने त्यांचेचे निकष लावले आहेत. त्यामुळे बळीराजा पिक विम्यापासून वंचित राहण्याची शक्यता जास्त आहे

शासकिय पंचनामे ग्राहय धरुन पिकाची नुकसान भरपाई दिली पाहीजे असा आग्रह बळीराजा करीत आहे.

शेवटी आताच्या परिस्थितीत त्यातून आलेली हतबलता यामुळे बेचैन होणे साहजिकच आहेपण तरीही कृपया मायबापानो कोणतेही टोकाचे पाऊल उचलू नका किंवा विचार करू नकाहीसुद्धा वेळ निघून जाईलआम्ही तुमच्या सोबत आहोत.कोणतीही अडचण असोआपण त्यातून नक्की मार्ग काढण्याचा प्रयत्न करूपण हार मानू नका. फोन आल्यानंतर योग्य यंत्रणेशी जोडून देऊन मार्गदर्शन करून सल्लामार्गदर्शन देऊनत्रस्त शेतकरयांना समुपदेशन करून मानसिक आधार देण्यात येईल त्यातून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना मदत झालेली आहे.फक्त शिवार हेल्पलाइनला ८९५५७७१११५ एक फोन कराअसे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री. तिर्थकर व  शिवार फाऊंडेशनचे प्रमुख विनायक हेगाणा यांनी केले आहे.
यासाठी मारिवाला हेल्थ इनिशिएटिव्ह,  तपस्वी पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट
उस्मानाबादकृषी महाविद्यालय,गडपाटीजिल्हा प्रशासनजिल्हा परिषदजिल्हा पोलीस दलकृषी विभाग व राष्ट्रीय सेवा योजना या  शासकीयअशासकीयस्वयंसेवी अशा सर्वच संस्थाचे सहकार्य मिळत आहे.

 

No comments:

Post a Comment

तेरणा पब्लिक स्कूल मध्ये इको फ्रेंडली गणेश मूर्ती निर्मिती कार्यशाळा संपन्न

  तेरणा पब्लिक स्कूल मध्ये इको फ्रेंडली     गणेश मूर्ती निर्मिती कार्यशाळा संपन्न उस्मानाबाद, उस्मानाबाद येथील तेरणा पब्लिक स्कूलमध्ये पर्या...